भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांबद्दल शरद पवारांचा मोठा दावा





माय नगर वेब टीम
 पुणे - भाजपच्या सत्तेमुळे ज्यांना निवडून यायची खात्री नाही, तेच लोक भाजपमध्ये चालले आहेत. शिवाय त्यांना ईव्हीएमचीही चिंता आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

जे लोक भाजपमध्ये जात नाहीत, त्यांना ईडीची भिती दाखवली जात आहे. हसन मुश्रीफ यांनी भाजपमध्ये यायला नकार दिला की लगेच त्यांच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड टाकण्यात आली, असंही पवार म्हणले.


 दरम्यान, मी पक्षातील सर्वांनाच आपलं मानतो, कुटुंबाचा भाग मानतो. जे गेलेत ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या माझ्याशी बोलून गेलेत. पण कोणाच्याही जाण्याने राष्ट्रवादीला काहीही फरक पडत नाही, असं मत पवारांनी पक्षातून होणाऱ्या पक्षांतराबाबत व्यक्त केलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post