सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपला; भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल!



माय नगर वेेेब टीम
मुंबई -  उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक झाली आहे. याअगोदरचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.

30 ऑगस्ट 2019 रोजी सी विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपला. 2014 च्या याच दिवशी त्यांनी राज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांचा काल कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी कुणाची नेमणूक होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते
आता कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून काम पाहतील.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सुमित्रा महाजन यांची वर्णी लागणार, अशी चर्चा होती. मात्र त्यांची वर्णी लागली नाही.

दरम्यान, देशात कुठल्याही राज्यपालांना मोदी सरकारनं दुसरी टर्म दिलेली नाही.








0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post