आलिया-रणबीरचं शुभ मंगल सावधान ठरलं!


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - बॉलिवूडचे क्यूट कपल म्हणून ओळख लाभलेल्या आलिया भट आणि रणबीर कपूरचं शुभ मंगल सावधान अखेर ठरलं आहे. दोघेही मागच्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आता या दोघांच्या कुटुंबियांनी या नात्याला रेशीम गाठीत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. माहितीनुसार, यावर्षी डिसेंबर महिन्यात आलिया-रणबीर लग्नगाठ बांधू शकतात. अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लग्नकार्य उरकणार आहे. आलिया आणि रणबीर दोघेही या प्रोजेक्टमध्ये काम करत आहे. ४ डिसेंबर रोजी ब्रह्मास्त्र प्रदर्शित होईल, असे सांगण्यात येत आहे. आलिया आणि रणबीर नुकतेच अरमान जैन आणि अनिसा मल्होत्रा यांच्या लग्नात एकत्र दिसले होते. इन्स्टाग्रामवरील काही हँडलवर दोन्ही परिवाराचे एकत्रित फोटोही दिसले होते. या वेडिंगचे फोटो आता इंटरनेटवर कमालीचे व्हायरल होत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post