भारताने न्यूझीलँडविरुद्ध सीरिज गमावली


माय अहमदनगर वेब टीम - न्यूजीलँडने भारताला सीरीजमधील दुसऱ्या वन-डेमध्ये 22 धावांनी मात दिली आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलँडने 274 धावांचे लक्ष दिले होते. हे लक्ष गाठण्यासाठी उतरलेल्या भारताने सर्वबाद 251 धावांचीच मजल मारू शकले. ऑकलँडच्या ईडन पार्कमध्ये आज(शनिवार) सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. श्रेयस अय्यरने वनडे करियरचे 7वे अर्धशतक लगावले. तो 52 धावांवर हामिश बेनेटच्या बॉलवर टॉम लाथमच्या हातात कॅच देऊन आउट झाला. तर केदार जाधव फक्त 9 धावा काढू शकला. कर्णधार विराट कोहलीला 15 धावांवर साउदीने क्लीन बोल्ड केले तर लोकेश राहुलदेखील फक्त 4 रन काढून कॉलिन डी ग्रँडहोमच्या चेंडूवर आउट झाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post