माय नगर वेब टीम
अहमदनगर : महापालिकेकडून जन्म व मृत्यू नोंदणी, तसेच विवाह नोंदणीची सुविधा आता चारही प्रभाग समिती कार्यालयात उपलब्ध करून दिली आहे. आजपासून (१ ऑगस्ट) नागरीकांना त्यांच्या प्रभाग समिती कार्यालयातच जन्म व मृत्यू, तसेच विवाह नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी महापालिकेने कर्मचारी नियुक्त केले आहेत.
जन्म व मृत्यू नोंदणी तसेच विवाह नोंदणी सध्या जुन्या महापालिकेत केली जाते. संपूर्ण शहरात एकाच केंद्र असल्याने तेथे नागरिकांची गर्दी होते. परिणामी, नागरीकांना वेळेत दाखले मिळत नाहीत. तसेच, केडगाव, बोल्हेगाव, सावेडी, तपोवन रस्त्यावरील नागरिकांनाही दाखल्यांसाठी जुन्या महापालिकेत जावे लागते. त्यामुळे आयुक्त यशवंत डांगे यांनी आता महापालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालयातच हे दाखले देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी प्रभाग समिती कार्यालयातच कर्मचाऱ्यांना जबाबदारी निश्चित करून देण्यात आली आहे. आजपासून ही सेवा कार्यरत होणार आहे.
Post a Comment