मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा करताच आण्णा हजारे म्हणाले..

 


माय नगर वेब टीम 

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली.जो पर्यंत जनता त्यांचा निर्णय देत नाही, तो पर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही असे म्हटले आहे. केजरीवाल म्हणाले, 'मी प्रत्येक घर आणि गल्लीबोळ्यात जाईन. जोपर्यंत जनतेचा निर्णय मिळत नाही तो पर्यंत मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसणार नाही, असे ते म्हणाले. यावर आता त्यांचे जुने सहकारी आण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


काय म्हणाले आण्णा हजारे?

केजरीवालांचं राजीनामा देण्या बाबतच भाष्य म्हणजे उशिराने सुचलेलं शहाणपण असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हटलं आहे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केलं. समाजसेवा करा आपण खूप पुढे जाल असा सल्ला आपण त्यांना सुरुवातीपासूनच दिला होता मात्र त्यांनी तो ऐकला नाही आणि शेवटी त्यांना या परिस्थितीला सामोरे जावं लागलं. आता त्यांना याची जाणीव झाल्याचं आण्णा हजारेंनी म्हटलं आहे.


'निवडणूक होईपर्यंत दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री असेल'

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुढे म्हटले, "काही लोक म्हणतात की सुप्रीम कोर्टने लावलेल्या निर्बंधांमुळे मी काम करू शकत नाही. त्यांनीही आमच्यावर निर्बंध लादण्यात कोणतीही कसर सोडली नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मी प्रामाणिक आहे, तर मला मोठ्या संख्येने मतदान करा. निवडून आल्यानंतरच मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसेन. फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत, पण महाराष्ट्राच्या निवडणुकांबरोबरच नोव्हेंबरमध्ये इथेही निवडणुका घ्याव्यात, अशी माझी मागणी आहे. निवडणुका होईपर्यंत पक्षातील दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री होईल. येत्या दोन-तीन दिवसांत आमदारांची बैठक होणार असून, त्यात पुढील मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय घेतला जाईल".


'आम्ही देशासाठी असेच लढत राहू' 

अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत म्हंटले की, " आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी देवाचे खूप आभार. आपण सर्व समस्यांवर ताबा मिळवत असून आपल्याला दुश्मनांसोबत लढण्यात यश मिळत आहे. आपण फक्त एक छोटासा पक्ष आहोत ज्याने या देशाचं राजकारण बदललं. यासाठी मी देवाचे आभार मानतो. त्यांचे षड्यंत्र आपलं आत्मविश्वास तोडू शकत नाहीत, आम्ही पुन्हा तुमच्यामध्ये आहोत. आम्ही असेच देशासाठी लढत राहू, आम्हाला फक्त तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post