विकासकामांमुळे निवडणूक सोपी; आमदार संग्राम जगताप नेमकं काय म्हणाले पहा...

 


माय नगर वेब टीम 

अहमदनगर : राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संग्राम जगताप म्हणाले की, तयारी आपल्याला निवडणुकीपूरती करून चालत नाही. आपण विजयी झालो की, पुढच्या निवडणुकीची तयारी करावी लागते. विकासकामे मोठ्या प्रमाणावर करावे लागतात. त्यामुळे आम्ही दोन्ही वेळेला निवडून आलो आणि लोकांनी आम्हाला दोन्ही वेळेस संधी दिली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

निवडणूक लागली की आपल्यावर गुंडगिरीचा आरोप होतो. याबाबत विचारले असता संग्राम जगताप म्हणाले की, उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. मला उत्तर देण्याची आवश्यकता पडली असती तर लोकांनी मला संधी दिली नसती. त्यामुळे लोकांना माहिती आहे की, आरोपात काही तथ्य नाही

निवडणुकीत मला कुणाचेही आव्हान वाटतं नाही. मी पाच वर्षे काम केले आहे त्यामुळे समोरून कुणीही उमेदवारी केली तरी फरक पडणार नाही असं जगताप म्हणाले. तर शहरातील भाजप नेत्यांनी नगरमध्ये मैत्री पूर्ण लढतीची मागणी केली होती. त्याबाबत बोलताना असं काही होणार नाही आणि माझाच विजय होईल असा विश्वास आ. जगताप यांनी व्यक्त केलाय.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post